Friday, December 31, 2010

नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.....

आज ३१ डिसेंबर २०१०, वर्षाचा शेवटचा दिवस. तुम्ही आज पर्यंत माझ्या ब्लॉग ला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तुम्हा सर्वांना नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सर्वांना येणारे वर्ष समाधानाचे, समृद्धिचे, आनंदाचे जावो.

ह्या वर्षाचा शेवटचा ब्लॉग मी पब्लिश केला आहे. ही एक कविता आहे. "उरले काही तास शेवटचे....."


चला, निरोप घेतो. परत भेटूच.


अभिजीत

Thursday, December 30, 2010

रेस्टोरेंटमधली पहिली भेट.....

अजुन अशीच एक आठवणीतली मैत्री. आठवणीतली एक मैत्री हा ब्लॉग जेंव्हा मी लिहित होतो तेंव्हा अशा बर्याच व्यक्ति माझ्या डोळयासमोर आल्या. त्यातलीच ही एक व्यक्ति.

दोन अडीच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या वेळेस मी खुप मुलींना ऑरकुट वरती फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या होत्या. प्रतिसाद ही चांगला भेटला. त्याप्रमाणे पुष्कळशा मुली अकाउंटला add ही झाल्या. काहीजणी चांगल्या मैत्रिणी बनल्या. काहीजणी कालांतराने निघून गेल्या. काही चांगल्या मैत्रिणी पैकी ही एक. आम्ही दोघे एकाच शाळेतले, म्हणून तिने माझी रिक्वेस्ट एक्सेप्ट केली होती. कालांतराने फ्रेंडशिप वाढत गेली. मोबाईल नंबर एक्सचेंज झाले. जी-टॉक वरती तिने तिचा फोटो ही दाखवला. पण फोटो दाखवताना केवढे नखरे केले असतील तिने, काय सांगू तुम्हाला. स्वतः चा फोटो दाखवताना कशाला एवढे नखरे करायचे हे कळत नाही मला. असो. तो ज्याचा त्याचा प्रश्न.

कालांतराने आम्ही भेटण्याच ठरवल. त्याप्रमाणे गोखले रोड वरती असलेल्या अमृता रेस्टोरेंट मध्ये आम्ही भेटलो. काय आर्डर केल असेल हे तुम्हाला कळलच असेल. अमृताची स्पेशालिटी पाव-भाजी आहे की हो. मग तेच मागवल. साधारण एक दिड तास आम्ही तिथे होतो. गप्पा मारल्या, मजा केली. पहिल्यांदाच भेटलो होतो पण बोलताना एकदम कम्फर्टेबल होती ती. तिच्या सोबत वेळ कसा गेला कळल नाही.

ह्या मैडम ने आपल्या आई ला सांगितल होत की, ती मला ह्या ह्या ठिकाणी ह्या ह्या वेळेला भेटणार आहे. हे ऐकून मला आश्चर्य वाटल. कारण माझ्या अनुभवानुसार मुली अस काही सांगत नाहीत घरात. असो. आज ही आम्ही एकमेकांच्या contact मध्ये आहोत. सध्या तिने C.A. ची फायनल वर्षाची परीक्षा दिली आहे. खुप मेहनती आहे. down to earth person. C.A. होण हे तीच स्वप्न आहे, ते पूर्ण होवो ही इच्छा.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.


अभिजीत

Tuesday, December 28, 2010

८ वर्ष जुनी मैत्री.....

काल एका मैत्रिणीकडे सत्य नारायणाच्या पूजेसाठी गेलो होतो. पोहचायला तसा उशीरच झाला होता. पण एकंदरीत सर्व कार्यक्रम तसा चांगला पार पडला. घरी येयला रात्रीचा १ वाजला. माझी झोपायची वेळ साधारण हीच आहे. पण झोप काही येत नव्हती. तिच्या सोबत घालवलेले काही क्षण, कॉलेज चे ते दिवस आठवले आणि मन आठवणी मध्ये रमत गेल.

८ वर्षापूर्वी कॉलेज नवरंग ला आमची ओळख झाली होती. तेंव्हा पासून आम्ही ओळखतो एकमेकांना. ग्रेजुएशनची शेवटची ३ वर्ष ती कोल्हापुरला होती. पण आज ही ते नवरंग चे दिवस आठवले की हसायला येत. खुप धमाल केली होती. सुरवातीचे काही दिवस आम्ही खुप कमी बोलायचो. कालांतराने फ्रेंडशिप वाढत गेली. पण फ्रेंडशिप समजण्याच, वाढवण्याच, निभवण्याच ते वय ही नव्हत. साधारण १ वर्षा नंतर ती कोल्हापुरला निघून गेली.

इकडे मी माझ्या लाइफ मध्ये बिझी झालो आणि ती तिकडे तिच्या लाइफ मध्ये. खुप कमीवेळा भेटलो आहोत आम्ही आजपर्यंत. शेवटी काय हो मी कधी कोणाला फोर्स नाही करत भेटण्यासाठी. मला एवढच वाटत की, समोरच्या व्यक्तीला मनापासून वाटत असेल तरच त्या व्यक्तीने मला भेटाव. असो. कालांतराने तीच ग्रेजुएशन पूर्ण झाल. ती मुंबईला परत आली. फिरण्याची खुप आवड या मैडम ना. ठाणे, पुणे, कोल्हापुर सारख्या फिरतीवर असतात. आता गेली २ वर्ष मुंबईतच आहेत. तेंव्हा आता आमच भेटण होत.

ग्रेजुएशन पूर्ण झाल्यावर तिने तीच पोस्ट ग्रेजुएशन पुण्यातून केल. आता पर्यंत आमच्याकडे मोबाईल आले होते. आता संपर्कात राहण जरा जास्त सोयीस्कर झाल होत. पुणे ते ठाणे तासनतास गप्पा मारल्या आहेत आम्ही, कधी सीरियस तर कधी एखाद्या गंमतीदार टॉपिकवर. कधी भांडलो आहोत तर कधी एकमेकांना समजुन घेतल आहे. जे काही क्षण एकत्र घालवले ते स्मरणात राहिले. गेली ८ वर्ष ना ती कधी माझ्या वाढदिवसाच्या पार्टीला आली ना कधी मी तिच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेलो. पण जेंव्हा जेंव्हा आम्ही भेटलो तेंव्हा तेंव्हा फुल ऑन एन्जॉय केल. मग ते एखाद्या होटेल मधल डिनर असो वा एखाद्या mall मध्ये बसून मारलेल्या वायफळ गप्पा असोत.

आज जेंव्हा मी तिच्याकडे पाहतो तेंव्हा मला खुप बर वाटत. कारण आयुष्य कस जगायच आहे हे तिला समजतय. गरज पडली तर ठामपणे ती निर्णय घेवु शकते. हल्ली आम्ही सहसा मोबाईल वर बोलत नाही. कधी भेटलो तर बोलण होत. पण तीच आणि माझ बोलण म्हणजे खुप मजाक मस्ती आणि खुप कमीवेळा सीरियस.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.


अभिजीत

Monday, December 27, 2010

आज वो मंझर भी कुछ धुंदला सा है.....

उसका चेहरा कुछ धुंदला सा है
उसकी यादे भी कुछ धुंदली सी है
पता नही किस मोड़ पे वो मिली थी मुझे
आज वो मंझर भी कुछ धुंदला सा है.

अभिजीत

रात का नशा अभी ढला नही.....

रात का नशा अभी ढला नही
प्यार का खुमार अभी छाया नही
रोज आती तो है वो सपनों में
पर प्यार का इजहार अभी हुआ नही.

अभिजीत

Friday, December 24, 2010

आठवणीतली एक मैत्री.....

उद्या २५ डिसेंबर नाताळ. २ वर्षापूर्वी ह्याच दिवशी एका मुलीला मी तलावपाळी ला भेटलो होतो. भेट काही जाणून बुजुन घडवून आणली नव्हती. अचानकपणे आम्ही एकमेकां समोर आलो होतो. पहिल्यांदाच समोरा समोर बोलणही झाल. मी हिला २ वर्षापूर्वी भेटलो हे खर पण ह्याची सुरवात साधारण त्याच्याही ६ महीने अगोदर झाली होती.

त्या वेळेस ऑरकुट खुप प्रसिद्ध होत. खुप जणांची फ्रेंडशिप जमवून देण्यात ऑरकुट चा हातखंडा होता. मी ही एकदा माझ ऑरकुट प्रोफाइल चेक करत होतो. तेंव्हा एका मुलीच प्रोफाइल मला चांगल वाटल. मी तिला add request पाठवली. तिने ही जास्त आढेवेढे न घेता request एक्सेप्ट केली. वरचेवर एकमेकांना स्क्रैप पाठवण चालू झाल. फ्रेंडशिप वाढू लागली. काही दिवसांनी g-talk ला आम्ही एकमेकांना add केल. आणि बऱ्या पैकी बोलण चालू झाल. तासनतास बोलत बसलो आहोत आम्ही chat वर. विषय कसे सापडायचे माहीत नाही. पण बोलायला बसलो तर विषयांची कमी नसायची. तिचा नेहमी एकच विषय असायचा बोलताना आणि तो म्हणजे फ्रेंडशिप. तिच्यासाठी फ्रेंडशिप म्हणजे सर्वकाही. करीअर, फॅमिली, स्वतःच्या आयुष्या पेक्षा ही जास्त महत्त्व फ्रेंडशिप ला. मला थोड आश्चर्य ही वाटायच आणि थोडा राग ही येयचा. अस वाटायच की तिला स्वतःच अस्तित्व अस काही नाही. मित्र मैत्रिणी बोलतील तेच तीच लाईफ. कोणीही तिचा फायदा घेवु शकत. कोणीही तिला हर्ट करू शकत. तरीही या मैडम शांतच राहणार. खुप समजवायचो. काही गोष्टी तिला समजल्या, काही अनुभवाने समजल्या. शेवटी काय हो काळ सगळयांना शिकवतोच की. २ वर्षा पूर्वीची ती आणि आजची ती.....ह्या मध्ये खुप फरक आहे.

एकदिवशी आम्ही chat वर बोलत असताना, मोबाईल चा विषय निघाला. तो पर्यंत आम्ही आमचे मोबाईल नंबर पण एक्सचेंज केले नव्हते. त्यावर शेवटी आमच अस ठरल की ज्या दिवशी आम्ही अचानक पणे एकमेकां समोर येवू त्या दिवशी आपण मोबाईल नंबर एक्सचेंज करू. आता आमच ठरवून भेटण होणारच नव्हत. कसे भेटणार होतो याची काहीच कल्पना नव्हती.
त्या नंतर बरेच दिवस आमच बोलण असच चालू होत. मोबाईल नंबर, भेटण हा विषयच नसायचा. खुप विषयांवर आम्ही बोललो. काही विषयांवर आमची भांडण झाली. पण फ्रेंडशिप नेहमीच टिकली. माझ्या मते फ्रेंडशिप हे निभवण नसत, तर ते एक जगण असत. एकमेकांकडून काहीही एक्स्पेक्ट न करता ते रिलेशन एन्जॉय करण.

नंतर मी तिला एक दोन ठिकाणी पाहिल ही होत. पण समजायच नाही की ती नक्की हीच आहे का?? त्या वेळेला ह्या मैडम ना पण समजायच की आपल्याकडे कोणतरी बघतय पण हिच्या चेहर्यावर काही हावभाव नसायचे. मग मी ही कसा जाणार हो डायरेक्ट विचारायला. नंतर chat ला भेटल्यावर तिला विचारायचो, की तूच होती का ती. तर मैडम हो बोलायच्या. आणि मी का नाही आलो बोलायला अस बोलून माझ्याशीच वाद घालायच्या. काय बोलणार मी. तिला विचारायचो, तू का नाही आलीस. तर मुलींची ठरलेली टिपिकल उत्तर देयची. कठीण असत हो हे सर्व. पण कधी राग नाही आला मला तिचा. असेच करत काही महीने निघून गेले.

शेवटी २५ डिसेंबर २००८, ह्या दिवशी मी संध्याकाळी तलावपाळी वर मित्रांसोबत आलो. मैत्रिणीं सोबत ही बसली होती. मी तिच्याकडे पाहिल पण तीच काही लक्ष नव्हत. शेवटी मनाशी ठरवल आज काही झाल तरी बोलायच. गेलो तिच्या समोर, बोललो तिच्याशी. ठरवलेल्या प्रमाणे मोबाईल नंबर ही एक्सचेंज केले. जे chat वरती आम्ही ठरवल होत, ते आज पूर्ण झाल होत. आज ही आम्ही कधी राम मारुती रोडवर, कधी तलावपाळी वर भेटतो बोलतो पण काहीही न ठरवता. आणि आज ही दिवसातून एक तरी sms असतो तिचा.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत

Thursday, December 23, 2010

नावात काय ठेवलय?????

हल्ली ब्लॉगिंग जोरात चालू आहे. २-३ दिवसा आड़ का होईना एखादी पोस्ट टाकतच आहे. आज असाच विचार करत बसलो होतो तेंव्हा एक सुविचार आठवला. "नावात काय ठेवलय".

विचार करा. या पृथ्वी तलावर मनुष्य प्राण्याच नामः करण झाल नसत तर काय झाल असत?? जग भरातल्या मनुष्य प्राण्याला कस संबोधल असत??? किती गोंधळ उडाला असता. पेन कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड, लाईट बिल, टेलीफोन बिल या वर काय नाव असती??? लोकांनी एकमेकांना कोणत्या नावाने हाक मारली असती??? जन्मलेल्या मुलांच बारस झाल असत का??? लव लेटर वर काय नाव लिहिली असती??? दोन व्यक्ति फोनवर बोलत असताना त्यांना एकमेकांची नाव माहीत असती का??? फ़क्त आवाजावरून समजाव लागल असत की माणूस आहे का स्त्री. wrong number ही पद्धत अस्तित्वात राहिली असती का??? बायकोने आपल्या पतीच नाव उखाण्यात घेतल असत का??? घरा बाहेर नावाची पाटी असती का??? स्कूल आयडी वर काय नाव असत??? लिविंग सर्टिफिकेट बनल असत का??? कॉलेज ला एडमिशन झाली असती का??? बायोडेटा बनला असता का??? बायोडेटा नाहीतर नोकरी भेटली असती का???

बापरे किती त्रास झाला असता??? पण मनुष्य प्राणी खुप हुशार हो. त्याने यातून ही मार्ग काढलाच असता. माझ्या मते यावर सोल्यूशन खुप सोप असत. माणसांनी नंबर ने एकमेकांना हाक मारली असती. प्रत्येकाला १० आकडी नंबर भेटले असते. तेच त्याच नाव असत. पेन कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड, लाईट बिल, टेलीफोन बिल, स्कूल आयडी, कॉलेज आयडी, बायोडेटा, एम्प्लोयी आयडी, ड्रायव्हिंग लायसंस ह्यांच्या नाव ह्या रखान्यात नावाच्या जागी नंबर असते.

प्रत्येकाने एकमेकांना नंबर ने हाक मारली असती. एकमेकांन मधल संभाषण सुद्धा काही अशा प्रकाराच असत.

१२३४५६७८९० : ०९८७६५४३२१ क्लास ला येणार आहेस का???
०९८७६५४३२१ : १२३४५६७८९०.....आज नाही जमणार रे.

हे सर्व पाहून एवढच वाटत.....खरच नावात काही ठेवलय??? :)

चला, निरोप घेतो. परत भेटूच.


अभिजीत 

Wednesday, December 22, 2010

परफेक्ट कॉम्बिनेशन.....

साधारण मागच्या महिन्यातली गोष्ट आहे. लग्नाला गेलो होतो. वडिलांच्या मित्राच्या मुलीच लग्न होत. लग्न तस जवळचच होत म्हणून जाव लागल. दुपारी १२ च्या सुमारास हॉल वर आलो. फॅमिलीसाठी दुसऱ्या रांगेतली जागा पकडली. पाहिल तर वेटर पाण्याचे ग्लास घेवुन फिरत होते. त्यांच्याकडून पाणी घेतल आणि शांतपणे खुर्चीवर बसलो. काकांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी बऱ्यापैकी खर्च केला आहे हे हॉलकडे पाहुनच कळल.

मंगलाष्टके सुरु होणार होती. मी इकडे तिकडे कोणी ओळखीच आहे का ते पाहत होत. सहजच माझ लक्ष आमच्या पाठच्या रांगेतील एका मुलीकडे गेल. आई बरोबर आली होती ती. खुप सुंदर होती दिसायला अस नाही. पण माझ लक्ष तिने वेधून घेतल एवढ नक्की. साधी सिंपल पण मनाला कुठेतरी भिडणारी. आई बरोबर होती म्हणून जास्त पाहता नाही आल मला तिच्याकडे.
तेवढ्यात मंगलाष्टके सुरु झाली. आता तिच्याकडे पाहता येण शक्य नव्हत. तिच्याकडे पाहत वधुवरांवर अक्षता टाकण कठीण काम होत. म्हणून मंगलाष्टके संपेपर्यंत शांत बसलो.

वधुवरांवर अक्षता टाकत असताना सहजच माझ लक्ष स्टेज वर उभ्या असलेल्या मुलींकडे गेल. त्यातली एक मुलगी एवढी  सुंदर होती की पहातच राहिलो मी. गुलाबी रंगाची नक्षीकाम केलेली low -waist  साडी तिने घातली होती. किती मेकअप केला होता तिने माहीत नाही. पण लय भारी दिसत होती. स्टेज वरती लग्न उरकल्या नंतर तिने स्वतःच फोटोशूट सुरु केल. फोटोग्राफर काकांकडून तिने वेगवेगळया पोज मध्ये फोटो काढून घेतले. आणि कोण तिला नाही म्हणेल हो. स्वतःच्या बहिणीच ही फोटोशूट तिने करून घेतल. तिची अदा, तिचे चेहर्यावरचे हाव भाव, तिच्या पोजेस पाहून मला दोन मिनिटे हसायला आल. (हसायला आल म्हणजे ती काही हसण्यासारख करत होती म्हणुन नव्हे तर तिला स्वतः मध्ये गुंतलेल पाहून) पण तिच्या वरून नजर काही हटत नव्हती. तिला ही थोड्या वेळाने कळल की आपल्याकडे कोणतरी पाहत आहे. तिने एक ओझरती नजर माझ्यावर टाकली आणि काही झालच नाही असा भाव चेहर्यावर आणून फोटोशूट मध्ये मग्न झाली. (मुलींची ही अदा तर वेड़ लावणारी असते हो) पण मी ही कसला सोडतोय. तीच फोटोशूट पूर्ण होई पर्यंत मी तिथेच बसून होतो. थोड्या वेळा पूर्वी ज्या मुलीला आई सोबत पाहिल होत तिला मी कुठेतरी विसरलो होतो.

थोड्या वेळाने एक मित्र भेटला. त्याच्याशी गप्पा मारत बसलो. नंतर आम्ही दोघे आणि त्याचा एक मित्र असे तीन जण लंच साठी गेलो. जेवत असताना ह्या बाई तिथे आल्या कोणाला तरी शोधत. मित्राला बोललो भारी दिसते राव ही. त्यावर मित्र बोलला.....केवढा मेकअप केला आहे म्हणून सुंदर दिसत आहे. त्याच ही बरोबर होत म्हणा. पण काही असो. सुंदर होती एवढ खर. जेवण संपवल आणि बाहेर आलो सिगरेट मारायला. मित्र बराच वेळ त्याच्या ex -girlfriend विषयी सांगत होता. बाहेरच काम उरकल्यावर मी परत हॉल मध्ये आलो.

नंतर वडील, मी, काका आणि वडिलांचे काही मित्र गप्पा मारत बसलो होतो. ज्यांच्या मुलीच लग्न होत ते काका ही आमच्या सोबत बसले होते. थोड्या वेळाने मी त्या गुलाबी साडी वालीला आमच्याकडे येताना पाहिल. तीच नाव काही मला शेवट पर्यंत काढता आल नाही. पुन्हा एकदा आमची नजर भेट झाली. ती जवळ आली आणि तिने काकांना स्टेज वर येण्यास सांगितल. पण तिचा आवाज काही मला आवडला नाही. थोडा गावंढळ, थोडा घोगरा असा काही तरी तिचा आवाज होता. नंतर कळल की ती मुंबई ची नव्हती. तेंव्हा अस वाटल की जेवढी सुंदर आहे दिसायला तेवढा आवाज ही सुंदर असता तर.

नंतर सहजच एक विचार मनात येउन गेला की आपल्याला किती गोष्टी परफेक्ट लागतात. मुलगी दिसायला सुंदर असली तर तिचा आवाज ही सुंदर असावा, आवाज सुंदर असला तर स्वभाव ही चांगला असावा. ही अपेक्षांची यादी कधी संपणार नाही. शेवटी compromise कराव लागतच. सुंदरते साठी स्वभाव आणि स्वभावासाठी सुंदरता. खुप कमी वेळा आयुष्यात परफेक्ट कॉम्बिनेशन मिळत. जस आहे तस एक्सेप्ट करायला आपण शिकलो तर आयुष्य खुप सुंदर आहे.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.


अभिजीत 

Wednesday, December 8, 2010

कोण करत हो एवढ?????

साधारण २ - ३ वर्षापूर्वीचा प्रसंग. माझ ऑरकुट प्रोफाइल चेक करत होतो. एका मुलीच प्रोफाइल खुप चांगल वाटल. तिला मी add request पाठवली. २-३ दिवसानी तिने ती request accept केली. आणि आमच scrap through बोलण चालू झाल. थोड्याच दिवसात g -talk ला आम्ही एकमेकांना add केल. २ -३ आठवडयात ह्या सर्व घडामोडी झाल्या. काही दिवसानी आम्ही मोबाइल नंबर एक्सचेंज केले. ह्या सर्व गोष्टी खुप फ़टाफ़ट घडल्या. काही चांगल घड़ायच असल की, घडतच की हो.

ती दिसायला कशी आहे हे मला माहीत नव्हत कारण ऑरकुट प्रोफाइल वर तिने कुठल्यातरी नटीचा फोटो लावला होता. पण आवाज सुंदर होता तिचा. फ़ोन वर तिच्या सोबत बोलताना वेळ कसा जायचा समजायच नाही. बोलण चालू झाल की आम्हाला वेळेच भान नसायच. एकंदरीत ती आणि मी आमच्या ह्या फ्रेंडशिप रिलेशन मध्ये comfortable होतो. पुढे जावून आम्ही भेटायच  ठरवल. त्याप्रमाणे  आम्ही वेळ, वार, ठिकाण ठरवल. मला आज ही आठवत जानेवारी चा शेवटचा आठवडा होता, आणि रविवारी सकाळी मी तिला भेटलो होतो.

भेटतानाचा प्रसंग खुप मजेशीर होता. मला माहीत नव्हत ती कशी दिसते, ती बाजुला येवून जरी उभी राहिली असती तरी मला समजल नसत की ती हीच आहे. आदल्या दिवशी रात्री आमच फ़ोन वर बोलण झाल, तेंव्हा ती बोलली होती की, ती ह्या ह्या ड्रेस कोड मध्ये येणार आहे.  मी ही तिला माझ्या शर्ट चा कलर सांगितला होता. प्लस तिला, मी कसा दिसतो हे ही माहीत होत, कारण ऑरकुट प्रोफाइल वर मी स्वताचाच फोटो लावला होता. जी काही पंचाईत होणार होती, ती माझीच होणार होती. असो, रविवार ची सकाळ उजाडली. मी ठरल्या प्रमाणे त्या जागेवर आलो. तिला कॉल केला, ती बोलली की मी रिक्षात आहे, १० मिनीटात येते. त्या जागेवरून जाणार्या प्रत्येक मुली कडे मी पाहत होतो आणि विचार करत होतो की ती कशी असेल ??? नाही म्हंटल तरी थोड टेंशन आल होत. अखेरीस अभिजीत म्हणून तिने हाक मारली. आम्ही एकमेकांना पाहिल, स्माईल केल. मी पहिल्यांदा तिला पाहत होतो. एवढे दिवस आम्ही फ़क्त फ़ोन वर बोलत होतो, आणि आज ती माझ्या समोर होती. जो प्रवास एका friends request पासून सुरु झाला होता, तो प्रवास आज तिला भेटल्यावर पूर्ण झाला होता.

मुंबई बाहेर तिच्या शहरात मी आलो होतो तिला भेटायला. आम्ही नंतर एका mall मध्ये गेलो, तिथे तिने मला एक wrist watch गिफ्ट केल. तिला माहीत होत की मला wrist watch आवडतात आणि माझ्याकडे wrist watch च कलेक्शन आहे हे.
कोण करत हो एवढ??? आणि ते ही २ महिन्यांच्या फ्रेंडशिपसाठी.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत

Tuesday, December 7, 2010

आयुष्य परफेक्ट बनवायच आहे.....

मागचा आठवडा घरी पाहुणे आले होते, म्हणून निवांत बसून लिहिण्यास काही वेळ मिळाला नाही. तसा मी घरी बसून काही काम करतो अस ही नाही. पण लिहिताना आजुबाजुला कोणी असलेल मला आवडत नाही. आज म्हंटल जरा वेळ आहे, तर लिहूया.

perfection or perfect or perfectionist  हे शब्द खुप वेळा मी ऐकले आहेत. तुम्ही ही ऐकले असतीलच. पण perfect म्हणजे नक्की काय??  मला तर याचा अर्थ एवढच कळतो की, जे संपूर्ण आहे, ज्यातून काही त्रुटी काढता येणार नाहीत, जे परिपूर्ण आहे. असो, मला काय म्हणायच आहे हे तुम्हाला कळल असेल.

आज प्रत्येकाला परफेक्ट रहायच आहे. प्रत्येकाला आपल आयुष्य एकदम परफेक्ट बनवायच आहे. छोट्या छोट्या गोष्टी ही एकदम परफेक्ट असल्या पाहिजेत हा आपला अट्टाहास आहे. विचार केला तर काय फालतुगिरी आहे. कशासाठी एवढ परफेक्ट रहायच आहे??? विचार केला तरी उत्तर सापडणार नाही आणि सापडल तरी ते उथळ असेल.

आता आपण जरा पाहुया की आपल्याला काय काय परफेक्ट हव आहे :-

* आपल घर, घरातल्या वस्तु ह्या गोष्टीं बद्दल आपण खुप possessive असतो. ह्या वस्तु एकदम परफेक्ट असाव्यात हा आपला अट्टहास असतो. घरातली एक जरी वस्तु त्या जागेवर नसेल तर आपल मन बेचैन होत आणि जो पर्यंत आपण ती वस्तु त्या जागेवर ठेवत नाही तो पर्यंत आपल्याला चैन पडत नाही. परफेक्ट ठेवायच आहे ना घर आपल्याला. घर स्वच्छ, सुंदर, चांगल नीटनेटक ठेवा पण त्याचा अतिरेक करू नका.

* आपल रिलेशन. एखादी मुलगी आपल्याला आवडते. आपली प्रेयसी बनते. नंतर आपण एक्स्पेक्ट करतो की ती अशी असली पाहिजे, तशी असली पाहिजे. तिने हे केल पाहिजे. ती सर्व गोष्टींमध्ये परफेक्ट असली पाहिजे, हा अट्टहास का??? एकमेकांना
judge करण, एक्स्पेक्ट करण हे कशासाठी??? जो पर्यंत तुम्ही एकत्र आहात तो पर्यंत ते रिलेशन एन्जॉय करा. प्रेम आहे म्हणून एकत्र रहा, adjustment म्हणून नाही.

* आपले मित्र मैत्रिणी. मैत्री मध्ये पण आपण खुप गोष्टी एक्स्पेक्ट करतो. फ्रेंडशिप अशी असली पाहिजे, तशी असली पाहिजे याचे तर्क वितर्क लावतो. सगळ काही परफेक्ट हव आहे ना आपल्याला.


* आपल dressing परफेक्ट असल पाहिजे हा आपला अट्टहास. हल्ली आपण brand contious झालो आहोत. branded shirts, branded jeans, branded shoes, branded watch, branded sack, branded goggles. सर्वकाही branded. ह्या सर्व गोष्टी आपल्याला परफेक्ट बनवतात अस आपल्याला वाटत. ह्या सर्व गोष्टीं साठी आपण पाहिजे तेवढा पैसा खर्च करतो. (अर्थात ज्याच्या कडे आहेत तोच खर्च करू शकतो) पण प्रत्येकाला हे अस आयुष्य जगण खुप आवडत. 

अर्थात चांगल आयुष्य जगायला कोणाला नाही आवडत. पण ह्याच गोष्टी वापरल्याने मी परफेक्ट होणार आहे अस आपल्याला का वाटत??? हे एक प्रकाराच obsession आहे. मी म्हणेन, branded रहा, नाही तर राहू नका. पण जे काही कराल त्यात comfortable रहा. presentable रहा. स्वताला आवडत म्हणून करा, कोणा दुसर्यांसाठी करू नका. 


अशा अजुन खुप काही गोष्टी असतील, ज्या आपल्याला परफेक्ट हव्या आहेत. माझा बोलण्याचा मुददा एवढाच आहे की,  आयुष्य हे एन्जॉय करण्यासाठी आहे. त्याला perfection च्या चौकटीत अडकवू नका.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत

Monday, November 22, 2010

प्रेम.....बघता क्षणीच!

प्रेम. आयुष्यात प्रत्येकाला एकदा का होईना प्रेम होतच. हे खुप ठिकाणी ऐकल आहे आपण. कमीत कमी एकदा आणि जास्तीत जास्त कितीही वेळा प्रेम होवू शकत. हे माझ मत आहे. (खुपजण माझ्या ह्या मताशी सहमत नाही होणार पण काहीजण  नक्कीच सहमत होतील) असो.

माझ्या मते प्रेम हे नेहमी love at first sight च असत. बघायला गेल तर खुप सिंपल आहे. एखादी मुलगी आपल्याला बघताच क्षणी आवडते. तिचा चेहरा, तिचे डोळे, तिची स्माईल आपल्याला वेड करून जाते. आपल्याला तिचा स्वभाव, तिचे विचार ही माहीत नसतात. तरीही आपल्याला ती आवडते. (इथे काहीजण बोलतील की हे फ़क्त attraction आहे) तर मी अस म्हणेन की प्रेमाची पाहिली पायरी हे attraction च आहे. एकमेकांचे स्वभाव जाणून घेयला अख्ख आयुष्य पडलय हो.

खुप वेळा मैत्रीतून प्रेम तयार होत. एखादी मुलगी फ़क्त आपली मैत्रिण असते. आपण काही वेळ तिच्या सोबत घालवतो. तिचे विचार आपल्याला आवडतात, स्वभाव जुळतात आणि आपण प्रेमात पडतो. माझ्या मते एकमेकांना समजुन घेवुन नंतर प्रेम कसे करायचे?? (या वर तुम्ही बोलाल की नुसत प्रेम महत्वाच नाही, एकमेकां सोबत आयुष्य घालवायच आहे त्यासाठी स्वभाव, विचार जुळण गरजेच आहे.) तुम्ही जे बोलत आहात ते बरोबर आहे. पण माझ्या मते, प्रेमात पडल्यावर बघा स्वभाव च काय आहे ते. स्वभाव जुळतात म्हणून प्रेमात कसे पडायचे??? सगळ्या गोष्टी adjust करता येतात हो पण प्रेम नाही adjust करता येत.

आपल्याला प्रेम व्हायच असेल तर ते बघता क्षणीच होत. दूसरा कुठला way नाही प्रेम होण्यासाठी. म्हणून खुप विचार, दुनियादारी करून काही फायदा नाही. शांत रहा. आपल स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि महत्वाच म्हणजे आयुष्य एन्जॉय करा.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत

.

Thursday, November 18, 2010

केवढा हा त्रास.....

कधी कधी लिहिण्यासाठी विषय सापडत नाही, कधी कधी एखादा विचार डोक्यात येतो आणि आपण लिहिण्यासाठी बसतो. तुमच्या रोजच्या आयुष्यात अशा खुप काही गोष्टी घडतात की ज्याचा तुम्हाला त्रास होतो. मग सहाजिकच आपण तत्वन्यानी बनतो, काही तत्व निर्माण करतो स्वताची की जेणेकरून होणारा त्रास कमी व्हावा. आपल्याला होणारया त्रासातून मुक्तता होण्यासाठी आपल्याला जे काही प्रयत्न करावे लागतील ते आपण करावेत. पण बघायला गेल तर आयुष्यात येणारे हे प्रोब्लेम्स खुप मजेशीर असतात. शेवटी काय हो प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोण. (खुप झाली प्रस्तावना, आता जरा पाहुया काय प्रोब्लेम असतात ते) 

१. आपण  कामाला निघतो. कड़क इस्त्री केलेला शर्ट घालून ट्रेन मध्ये चढतो. उतरे पर्यंत त्या शर्ट चे जे काही हाल झालेले असतात ते आपल्यालाच पहावत नाही आणि ज्या मुलीला इम्प्रेस करण्यासाठी हे प्रयत्न केलेले असतात, ते एका क्षणात विफळ होतात. केवढा हा त्रास.

२. आपण कॉलेज ला जायला निघतो. नविन कपडे घातलेले असतात आणि पक्षी त्यावर आपले सकाळचे विधि उरकतात. काय अवस्था होत असेल आपली.

३. आपण बार मध्ये ड्रिंक्स घेत असतो आणि समोरच आपल्या ओळखिची एक व्यक्ति बसलेली असते.
(ती व्यक्ति बहुतेक वेळा आपल्या वडिलांच्या ओळखिचीच असते)

४. टपरीवर आपण सिगरेट मारत असतो आणि तेंव्हाच कोणतरी रिक्षातून आपल्याकडे बघत निघून जात.

५. जी मुलगी आपल्याला आवडत असते, तिला नेमक दुसर कोणतरी आवडत असत.

६. graduation, post-graduation करून ही, आयुष्य सेटल होई पर्यंत अर्ध आयुष्य निघून गेलेल असत.

७. ज्या मुलीशी आपल वाकड असत, ती अशी ना तशी आपल्या समोर येतेच.

८. वर्षभर काम करूनही appraisal चांगल मिळत नाही.

९. लग्न करताना प्रेम महत्वाच नाही, पैसा महत्वाचा आहे. भूतलावर बहुतेक सर्व लोकांनी हे मान्य केलेल आहे. (मग हुंडा मागणे हा गुन्हा का आहे???)

१०. ज्या मुलीवर आपल प्रेम असत, त्याच मुलीच्या मैत्रिणीच आपल्यावर प्रेम असत.

११. खिशात १००० रुपये असताना, खरेदी करताना आपल्याला २००० ची  जीन्स आवडते. (पण १००० रुपयात आपल्याला जीन्स आणि शर्ट दोन्ही खरेदी करायच असत हो)

१२. एखाद्या मुलीला तुम्ही आवडत असाल तरीही तुम्हीच तिला propose करावा असा तिचा अट्टाहास का???

१३. जी मुलगी तुम्हाला आवडते, ती दुसऱ्या कोणाची तरी प्रेयसी असते.

१४. ज्या दिवशी आपल्याला लवकर घरी जायच असत, त्याच दिवशी आपण उशिरा घरी येतो.

१५. मोबाइल वर काही महत्वाच बोलत असताना, मोबाइल स्विच ऑफ होणे, मोबाइल च नेटवर्क गायब होणे, मोबाइल मध्ये disturbance येणे, अशा गोष्टी घडतात.

खुप प्रोब्लेम सांगितले हो. अजुन ही बरेच असतील, आठवत नाहीत मला आता. हे एवढे प्रोब्लेम लिहून काढण्याचा सुद्धा केवढा हा त्रास.

चला निरोप घेतो, परत भेटूच.

अभिजीत  

Tuesday, November 16, 2010

मला तिला भेटायच आहे.....

मागचा महिना आणि दिवाळी चा पहिला आठवडा, मस्त मजा मस्ती चालू होती. एरव्ही पण असतेच हो पण दिवाळी म्हंटल की जरा जास्तच. आणि मित्र म्हंटले की मजा मस्ती आलीच हो. दिवाळी चा पहिला दिवस म्हणजे खुपच भारी दिवस. 

ह्यावेळे ही असच, सकाळी लवकर (म्हणजे ८ वाजता) आंघोळ उरकली आणि मित्रांना भेटायला राम मारुती रोड वर आलो. (मी ठाण्याला राहतो, आमच्या इथल खुप प्रसिद्ध ठिकाण) दिवाळी च्या पहिल्या दिवशी ठाण्यात राम मारुती रोड, तलावपाळी, कोपिनेश्वर मंदिर ह्या ठिकाणी तरुण वर्गाची जरा जास्तच गर्दी असते. मी ही त्याच गर्दीचा एक हिस्सा आहे. 
(विषयांतर होत आहे मी मूळ मुद्द्याकडे येतो)

मी राम मारुती रोड वर आलो. तिथे कुठल्यातरी एका संस्थेतर्फे एक band group आला होता. कुठली तरी नविन जुनी गाणी ते गात होते. गर्दी ही चांगली जमली होती. (कधी संपणार हो ही प्रस्तावना, मूळ मुद्द्या कडे येयच राहून जातय) 
(एकंदरीत तुमच्या डोळ्या समोर चित्र उभ राहिल असेल की, सकाळी ८-९ वाजताच थंड वातावरण, तरुण तरुणीनी भरलेला राम मारुती रोड, त्या band group च्या गाण्यांनी सजलेला आसमंत)

आम्ही नंतर कोपिनेश्वर मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला कारण आमचा एक मित्र आम्हाला तिथेच भेटणार होता. पण मुलीं वरून नजर काही हटत नव्हती. खुप सुंदर दिसत होत्या. (ज्या मुलीला नेहमी जीन्स आणि टीशर्ट मध्ये पाहिलेल असत, तिला साडी मध्ये पाहण्याची मजा काही औरच असते) मुली साडी परिधान करुनच खुप सुंदर दिसतात, माझ्या ह्या वाक्याशी सर्वजणच सहमत असतील. (खुप झाल, परत विषयाकडे याव)

मंदिरात जाण्यास आम्ही निघालो. वाटेवरच कूल कैंप नावाच आइसक्रीम पार्लर येत. आम्ही काही तिथे ब्रेक घेतला नाही. पण तिथे एका मुलीने माझ लक्ष वेधून घेतल. तिची सुंदरता मी शब्दात नाही व्यक्त करू शकणार. खुप सुंदर आहे दिसायला ती. तीच नाव मी इथे नाही घेणार. (ह्याच मुलीला मी एक आठवडया पूर्वी गोखले रोड वर तिच्या आई सोबत पाहिल होत) कूल कैंप ला ती मैत्रिणीं सोबत उभी होती.

तिथून आम्ही पुढे निघालो, ते थेट मंदिरातच आलो. अगोदरच उशीर झाला होता. आमचा मित्र वाट पाहून वेडा झाला होता. त्याला आलेला राग त्याच्या बोलण्यातुन प्रगट होत होता. थोड्यावेळाने काही जण मंदिरात दर्शनासाठी गेले आणि आम्ही  बाहेरच थांबलो. काही ओळखीचे चहरे दिसले, त्यांना भेटलो. कॉलेज च्या आठवणी ताज्या केल्या. निघण्या आधी फोटो बीटो काढले.बाहेर थांबायच कारण म्हणजे मुली पाहणे एवढच. (खुपच विषयांतर होत आहे, मंदिराचा हा प्रसंग घालण, हे काही एवढ महत्वाच नव्हत पण म्हंटल असू दे)

नंतर आम्ही जो मोर्चा वळवला तो पेटपूजे कडे. साईं कृपा मध्ये पेटपूजा करून झाली. नंतर आम्ही थेट आलो ते सिगरेट च्या टपरी वर. तिथे ठरल की गोलमाल ३ बघुया, म्हणून दोघे जण बाईक ने जावून टिकिट मिळतील की नाही ते पाहून आले. शो काही एवढे हाउसफुल नव्हते म्हणून दुसऱ्या दिवशी येवून टिकिट काढण्याचे ठरले. गेली २ वर्षे आम्ही दिवाळीत  मूव्ही पाहत आलेलो आहोत. चांगला असो वा बकवास, पहायचा नक्की. अनुभव काही चांगला नाही कारण मागच्या वर्षी 'blue' पहिला आणि त्याच्या आदल्या वर्षी 'om shanti om' पहिला. तुम्हाला सांगायला नको, काय आमची अवस्था झाली असेल ती. असो दुसऱ्या दिवशी आम्ही eternity ला आलो. टिकिट काढायच होत ना हो.

mall च्या campus मध्ये उभा होतो. मित्र बोलला, रिक्षातून जी उतरत आहे तिला बघ. बघतो तर काय. काल जिला आइसक्रीम पार्लर बाहेर पाहिल होत, तीच होती. २ आठवडयात ३ वेळा ती माझ्या समोर आली होती. एकदा गोखले रोड वर, दुसर्यांदा कूल कैंप आइसक्रीम पार्लर बाहेर आणि तिसर्यांदा eternity mall मध्ये. घरी गेल्यावर मी तीच फेसबुक प्रोफाइल शोधून काढल. (नाव माहीत असल्यामुळे ते सहजच सापडल) पण तिला काही मी friend request पाठवली नाही. साधारण १ महीन्या पूर्वी एका मित्राशी मी ह्या मुली बद्दल बोललो होतो. माझी काही अपूर्ण राहिलेली काम पूर्ण झाली की मला तिला भेटायच आहे. बघू, कस काय जमतय ते.

गोलमाल ३ विषयी सांगायच राहून गेल की हो. संध्याकाळच्या शो च टिकिट काढल. मूव्ही म्हणाल तर फुल ऑन टाइमपास  आहे. डोक बाजूला ठेवा आणि मूव्ही एन्जॉय करा. (मी काही इथे गोलमाल ३ ची advertisement  नाही करत आहे)

चला निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत 

Wednesday, November 10, 2010

सर्वसामान्य माणूस

मागचा १ महिना काही लिखाण झाल नाही. वाटायच लिहावस पण काही विषय मिळत नव्हता. आणि आज ही असा काही महत्वाचा विषय नाही. आयुष्यात महत्वाच अस काही घडतच नाही आहे. तस बघितल तर सर्व सामान्यांच्या आयुष्यात काय महत्वाच घडत अस??? शेतात राबणारया शेतकरया पासून ते औद्योगिक शहरात काम करणारया नोकरदार वर्गापर्यंत. काय आहे आपल आयुष्य???

शेतकरी शेतात राबराब राबतो, मेहनत करतो, पिक काढतो पण किती किंमत भेटते त्याला त्या पिकाची??? (श्रीमंत शेतकर्यां बद्दल मी इथे बोलत नाही आहे.) आपल्याकडे गरीब शेतकर्यांची संख्या जास्त आहे हो. त्यांना एक चांगल आयुष्य जगण्याचा अधिकार नाही आहे का?? मी आजकल खुप लोकांकडून ऐकतो की गावाकडच आयुष्य खुप सुंदर. गावाकडच निसर्ग सौंदर्य अप्रतिम. कामातून निवृत्त झालो की गावाला जावून राहणार, वगैरे. पण तिथे जावून कोणी आपल्याला त्यांच्या सारख खडतर आयुष्य जगण्यास सांगितल तर आपण जावू का???

औद्योगिक शहरात काम करणारा नोकरदार वर्ग. गावतल्या लोकांना खुप अप्रूप असत शहराच. पण शहरातले लोक काय आयुष्य जगत आहेत हो??? आपण किती तास काम करायचे, हे इथे कोणी पाळत नाही. सकाळी कामावर जाण्याची वेळ फिक्स, पण घरी येण्याची??? (काही सरकरी कार्यालय सोडली तर सगळयांची परिस्थिति हीच आहे.) आम्ही कमवण्यासाठी जगतो का जगण्यासाठी कमावतो??? हाच प्रश्न आहे. महिना आखेर एक फिक्स रक्कम घरात येते. त्या तुटपुंज्या रकमेतून, किती गोष्टी आपल्याला करायच्या असतात. बिल्स भरण्यापासून ते राहत्या घराचे हफ्ते भरे पर्यंत. तुमची मजा मस्ती तर राहिलीच बाजूला. मग का हा एवढा खटाटोप??? तुम्ही बोलाल की आज आमचे पगार वाढले आहेत. आम्ही जास्त खर्च करू शकतो. पण खर्च करण्यासाठी असा कितीसा वेळ तुमच्याकडे असतो??? असे किती जण आहेत की जे work satisfaction म्हणून काम करतात?? सोमवार ते शुक्रवार घासायची आणि वीकेंड ला ढोसायची. (दारू पिणे हा ही enjoyment चा भाग आहे शेवटी, खुप लोक सहमत होतील माझ्या ह्या वाक्याशी.) शेवटी काय हो, कमवण्यासाठी जगत आहोत आपण. खरच आयुष्य एन्जॉय करण विसरलो आहोत आपण.

आपल्याला अशा जगण्याची एवढी सवय झाली आहे की, आयुष्य हे असच असत. हा आपला समज झाला आहे. शेवटी  सर्व सामान्य माणस ही पदवी आपल्याला बहाल केली गेली आहे. ह्या चाकोरी बाहेर या. आयुष्य एन्जॉय करा.

अभिजीत 

Saturday, September 18, 2010

काही क्षण.....

२ आठवडया पूर्वी बँकेत गेलो होतो, थोड काम होत. बँकेची स्लिप भरली आणि रांगेत उभा राहिलो. महिन्याचा पहिलाच आठवडा होता, बँकेत खुप गर्दी होती. सगळी pensioners माणस रांगेत उभी होती. गर्दी पाहून विचार केला की जावू दे नंतर येवू कधीतरी. पण आई ने सांगितलेल काम होत म्हणून गप्प उभा राहिलो रांगेत. साधारण माझा ११ वा किंवा १२ वा नंबर होता. काउंटर वर बसलेली बाई एवढ्या सावकाश काम करत होती, वाटल आज हयानां कंप्यूटर दिले आहेत तरी ही एवढा वेळ लागतो, मग काय फायदा, त्या पेक्षा जुन्या पद्धतीनेच काम करा ना, कशाला हवेत computers. जावून दे हा काही माझा मुददा नाही बोलायचा. रांग एकदम सावकाश पुढे सरकत होती. स्वतःशीच बोलत होतो, काय कराव आता?? वेळ पण काही जात नाही. मग उगाचच इकडे तिकडे पाहू लागलो. तेंव्हा माझ सहजच लक्ष गेल.

माझ्या पुढे १,२ माणस सोडून, एक मुलगी आणी तिच्या पुढे एक मुलगा उभा होता. तो अशा direction मध्ये उभा होता की त्या मुलीला पाहू शकेल. आणि मित्रांनो ह्या मुलाने काउंटर वर त्याचा नंबर येई पर्यंत एकदाही काउंटर कडे वलून बघितल नाही. त्या मुलीला कस इम्प्रेस कराव ह्याच प्रयत्नात तो लागला होता. त्याच्या एखाद दुसरया कमेन्ट वर ती मुलगी हसायची आणि त्याला positive response देयची. म्हणून तो ही खुश होता. तिच्याकडे direct बघता येण शक्य नव्हत म्हणून जस होइल तस तो तिच्या डोळ्यात पहाण्याचा प्रयत्न करत होता. त्याची ही धडपड एखादवेलेस तिला ही समजत होती. म्हणून ती ही smile करून त्याला प्रत्युत्तर देत होती. त्या मुलीची आई, तिथेच एका बाकड्यावर बसली होती. ती ही अधून मधून आपल्या मुली कडे पाहत होती. मधेच मुलगी ही मागे वलून पहायची की आई काय करत आहे. पण त्या मुलाला कोणाचीच काही पडली नव्हती. त्याने आपले प्रयत्न चालूच ठेवले. हे सगळ पाहत असताना, मला एक सुंदर आवाज कानावर आला.

एक मुलगी आणि कोणतरी तिची मैडम माझ्याच रांगेत पाठी उभ्या होत्या. ती मुलगी (तिच्या मैडमशी) बोलत होती की, आज एवढी गर्दी कशी काय??? मी मागे एकदा जेंव्हा आली होती, तर लगेचच माझा नंबर लागला होता. आज खुपच गर्दी आहे. मी एक काम करते, आपण दोघी एकाच रांगेत उभ राहण्यापेक्षा, मी बाजुच्या रांगेत उभी राहते. अस म्हणून ती माझ्या बाजूच्याच रांगेत आली. बाजुच्या रांगेत ती माझ्या थोड पुढे उभी होती. आता पर्यंत तर फ़क्त मी तिचा आवाज ऐकत होतो. पण मागे वलून पाहण्याच साहस काही माझ्याने होत नव्हत. पण आता ती माझ्या पुढेच उभी होती त्यामुले तिला पाहता येण खुप सोप झाल होत.

मी जेंव्हा तिला पाहिल, तर पहातच राहिलो. खुप सुंदर होती दिसायला. शब्दात वर्णन नाही करू शकणार मी. अस समजा की त्या बँकेत कोणी एक सुंदर मुलगी आहे तर ती हीच आहे. मनात विचार येउन गेला की ही माझी प्रेयसी झाली तर. पण ओळख कशी करणार हो मी तिच्याशी???  मागे तिच्या मैडम उभ्या होत्या. बोलायच झाल तरी बोलणार कस?? मी तिच्याकडे पाहत आहे, हे तिला कळल. म्हणून तिने ही एकदा माझ्याकडे पाहिल. तिने बघून न बघितल्यासारख केल. मी ही असच केल. पण थोड्या वेळाने कधी मी तिच्याकडे पाहत होतो तर कधी ती माझ्याकडे. त्या वेळच्या भावना मी शब्दात व्यक्त करू शकणार नाही. खुप भारी फीलिंग असत हे, अनुभवण्यात मजा आहे, सांगण्यात नाही.

या सगळ्यात, वेळ कसा निघून गेला कळल नाही. माझा नंबर आला काउंटर वर. मी त्या मैडम ला स्लिप दिली, asusual बराच वेळ घेतला तिने. बैंक मधल काम संपवून मी बाहेर पडलो. माझ एका xerox च्या दुकानात पण काम होत. ते संपवून मी येत असताना, ती मला पुन्हा दिसली. या वेळेस ती एकटी होती. मी तिच्याकडे पाहिल पण तीच काही लक्ष नव्हत. खुप घाईत होती ती. मी तिला पास ऑन झालो आणि घरी येण्याचा मार्ग पकडला.

आज जेंव्हा मी विचार करतो, तेंव्हा मला अस वाटत, समजा त्या वेळेस मी बैंक मधली गर्दी पाहून तिथून निघालो असतो तर या सर्व क्षणांना मला मुकाव लागल असत. चला मित्रांनो निरोप घेण्याची वेळ आली, परत लवकर भेटूच.

अभिजीत

Tuesday, August 24, 2010

जन्म, मृत्यु आणि प्रवास

आपल्या जीवनाचे तीन मुख्य अविभाज्य घटक, जन्म, मृत्यु आणि प्रवास. आपल जीवन हे या तीन घटकां मध्येच आहे. मी जेंव्हा विचार करतो, तेंव्हा मला अस वाटत की आपल जीवन हे एका बोगद्या (tunnel) सारख आहे. जिथे एका बाजूने आत येयच आणि दुसरया बाजूने बाहेर पडायच. आणि ह्या दोन टोकांमधल अंतर म्हणजे एक प्रवास.

आता आपण थोड सविस्तर बोलूया. थोडा वेळ समजा, हा बोगदा म्हणजे आपल जीवन. एका बाजूने आत येयच म्हणजे, जन्माला येण. आणि दुसरया बाजूने बाहेर पडायच म्हणजे, मृत्युला सामोर जाण. जन्म आणि मृत्यु या दोहोंमधल अंतर म्हणजे आपल्या जीवनाचा प्रवास. आणि ह्या प्रवास मधे कुठे थाम्बण (stop), हा पर्याय नाही. (there are no signals in tunnel, so you can't stop).

जीवन हे असच आहे, एका नदी सारख. नदी जशी डोंगर खोर्यात उगम पावते, पुढे आपल्या मार्गात येणारा प्रत्येक प्रदेश सुपिक बनवते आणि शेवटी सागरात विलीन होते. तसच आपल जीवन आहे. जन्म, प्रवास आणि मृत्यु. नदीच पाणी हे नेहमी वाहत असत,  तसच जीवनाच्या ह्या प्रवास मधे कुठे थाम्बण (stop) हा पर्याय नसतो.

मला एवढच कळत की, आपण कोणी अंतर्यामी नाही. जन्माला कसे आलो माहीत नाही. मृत्यु कधी होणार माहीत नाही. आपली स्वप्नं पूर्ण होणार की नाही माहीत नाही. स्वप्नं पूर्ण होण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न आपल्या कडून होणार आहेत की नाही हे ही आपल्याला माहीत नाही. (पण मला अस वाटत की, स्वप्न पूर्ण करण हे कधी नसतच, स्वप्न हे आयुष्यभर जगण हेच असत). इथे कुठल्याच गोष्टीची शाश्वती नाही. मग अशी कुठली गोष्ट आहे, जी आपल्याला प्रेरीत करत आहे. आपण आशावादी आहोत आणि पुढे काय होणार आहे हे आपल्याला माहीत नाही. हेच उत्तर आहे यावर. पण एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपण कटपुतली आहोत आणि सर्व काही pre-planned आहे. म्हणून जास्त विचार करू नका, तुमच्या स्वप्नासाठीच तुम्ही इथे आला आहात असा विचार करून शांतपणे आपल काम करत रहा आणि लाइफ full-on जगा.

चला आता मी निरोप घेतो तुमचा, परत लवकर भेटूच.

अभिजीत

Thursday, August 19, 2010

Friends.....there is no substitute for them.....

आपण खुप वेळा खुप विषयावर लिहित असतो पण जे आपल्या जवळचे आहेत, त्यांच्या साठी कधी लिहितो का ? खुप वेळा आपण त्यांना गृहीत धरतो (take it for granted ). आपण विचार करतो, आपलेच आहेत, नाही लिहिल तरी काय फरक पडतो ??? पण कधीतरी त्यांचे आभार व्यक्त करण गरजेचे आहे, कारण ते नसतील तर आपले जीवन अपूर्ण आहे.

माझी फ्रेंड लिस्ट पहिली तर खुप मोठी आहे, (बघायला गेल तर प्रत्येकाची फ्रेंड लिस्ट ही मोठीच असते). १) काही फ्रेंड (हाय, हेल्लो) वाले असतात. २) काही नेहमीच्या contact मधले, (म्हणजे ऑरकुट, फेसबुक, chat ) वरचे असतात. ३) आणि काही (take it for granted ) वाले असतात. 3rd लिस्ट मधले 2nd लिस्ट मधे ही असतात. काही आयुष्यभर तुमच्यासोबत असतील, काही मधेच सोडून जातील.  पण त्या व्यक्तीची कहिनाकाही खास भूमिका तुमच्या आयुष्यात असते.

अशाच काही व्यक्तिंबद्दल आज मी बोलणार आहे :-
सतीश : माझा शाळेत असल्यापासुनाचा मित्र. कोणालाही न घाबरता, लाइफ एन्जॉय करतो. (पण शाळेत असताना खुप शांत होता, आता कोणाला ऐकत नाही भाई)
विजय : कॉलेज मित्र.  नेहमी विचार करून बोलणारा माणूस. पण अजुन ही struggle चालू आहे (विचारांशी).
प्रेमळ : कॉलेज मित्र. प्रत्येक गोष्ट बजेट मधे बसवाणारा माणूस. मित्रांचा मित्र. पण struggle आज ही चालू आहे.
वैभव : कॉलेज मित्र. खुप struggle केल आहे भाई ने. आज एकदम भारी लाइफ जगत आहे.
सुयोग : कॉलेज मित्र. नेहमी एक शिस्तबद्ध लाइफ जगणारा. जे आहे त्यात समाधानी.
मनोज : कॉलेज पासुनाचा मित्र. खुप कमी बोलतो. स्वताच्या तत्वांवर लाइफ जगणारा.
नारायण : कॉलेज मित्र. खुप कमी बोलतो हा भाई. शांतपणे आपली लाइफ जगणार हा.
शकील : ऑफिस मित्र. ह्याने  खुप struggle केली आहे लाइफ मधे, आज सेटल आहे.
गणेश : ऑफिस मित्र. स्वभावाने खुप चांगला, (down to earth person).
दीप्ती : कॉलेज मधली पहिली मैत्रिण. आज सेटल आहेत बाई.
कामिनी : कॉलेज मैत्रिण. कॉलेज व्यतिरिक्त भेटण नव्हत. पण एक चांगली मैत्रिण.
क्रांति : कॉलेज मैत्रिण. आज ही तीच हसण आठवत. माहीत नाही आज ही कुठे आहे.
राशी : कधी बोललो नाही तरी ही आठवणीत आहे कुठे तरी.
स्नेहल : कॉलेज मैत्रिण. कॉलेज व्यतिरिक्त भेटण नव्हत. एक चांगली मैत्रिण.
स्मिता : कॉलेज मैत्रिण. ८ वर्ष जुनी मैत्री.  हिचा struggle आज ही चालू आहे.. :-)
वंदना (senior) : कॉलेज मैत्रिण. तिचा हसरा चेहरा आज ही समोर आहे. खुप चांगली मैत्रिण. आज सेटल आहे.
मानसी : कॉलेज मैत्रिण.  खुप चांगली मैत्रिण. आज सेटल होण्याच्या मार्गावर आहे.
ह्रिषिता (hrishita) : ऑरकुट फ्रेंड. कधी भेटलो नाही. पण ही आज (ohio university) मधे शिकत आहेत.( I miss her ) :-)
अनुराधा : ऑरकुट फ्रेंड. खुप चांगली मैत्रिण. पुण्याला एकदा तिला भेटलो होतो.
स्नेहल : ऑरकुट फ्रेंड. खुप चांगली मैत्रिण.
श्रद्धा : ऑरकुट फ्रेंड. friends हेच तीच लाइफ.
युगा : ऑरकुट फ्रेंड. डोळ्यात काही स्वप्न सजवली आहेत, पूर्ण व्हावी ही इच्छा.
प्रिया : जॉब वर असताना ओळख झाली होती. ५ वर्ष जुनी मैत्री, खरच एक खुप चांगली मैत्रिण.
जुली :  जॉब वर असताना ओळख झाली होती. खुप छान गाते.
प्रांजलि : जॉब वर असताना ओळख झाली होती. एक चांगली मैत्रिण.

ह्यातले सर्वच जण काही माझ्या संपर्कात नाहीत. काही जणांचा उल्लेख करायला मी विसरलो ही असेन. But there is no substitute for friends. भविष्यात आपण कुठल्याना कुठल्या वळणावर परत भेटूच.

अभिजीत

Thursday, August 5, 2010

एक आठवण

खुप दिवस काही लिखाण झाल नाही. विचार केला आज एक तरी पोस्ट टाकुया. आज एका प्रवासताला प्रसंग तुम्हाला सांगणार आहे. साधारण २ वर्षा पुर्वीचा प्रसंग आहे.


मी आणि वडिल महाड (माझे गाव) ला चाललो होतो त्या वेळेचा. ठाणे (खोपट) वरून  सकाळी ६.४५ ची ठाणे-महाबलेश्वर एस. टी. पकडली. रिज़र्वेशन आधीच केले होते. म्हणून काही प्रोब्लेम झाला नाही. पण मला हा प्रवास काही आवडत नाही, गावा ला जायचे म्हणजे मला खुप बोर होते. पण या वेळेस जाण भाग होत. प्रवास बोरिंग असल्यामुळे मी झोप काढायच ठरवल. साधारण रामवाडी ला मला जाग आली. बस स्टॉप ला आम्ही उतरलो, आणि चहा घेतला. थोड़े पाय मोकळे केले आणि बस मध्ये जाउन बसलो. अजुन अर्धा प्रवास बाकि होता. वेळ जात नव्हता, परत ठरवून झोपायचा निर्णय घेतला. कधी संपणार हा प्रवास हाच विचार करत झोपून गेलो. शेवटी मला जाग आली ती इंदापूर ला. गाडी फ़क्त १० मिनिटे थाम्बनार होती, म्हणून गाडीतच बसून राहिलो. प्रवास आता थोडाच राहिला आहे, हे स्वताला समजावत होतो. लोक एक सारखे गाडीत चढत होते, त्या ड्राईवर ला पण काही घाई नव्हती, कोणाची वाट पाहत होता, ते त्यालाच ठावुक. थोड्या वेळाने २ मुली बस मध्ये चढल्या आणि ह्या माणसाने गाडी चालू केली. बहुतेक हा त्या २ मुलींची च वाट पाहत होता...:) मनातल्या मनात शिव्या घातल्या आणि गप्प बसलो.


पण पुढे जे घडल ते खुप भारी होत. जी पहिली मुलगी आत आली, तिच्या बद्दल मी काय सांगू?? खुप सुंदर होती दिसायला आणि तेवढीच साधी ही. दोन क्षण पहातच राहिलो मी. एवढी सुंदर असून ही, त्याचा गर्व नाही तिला. तिने yellow कलर चा पंजाबी ड्रेस घातला होता आणि स्पेक्ट्स. एका हातात पुस्तके आणि दुसरया हातात बेग. ह्या सगळ्या गोष्टी सावरत ती बसण्या साठी जागा शोधत होती.  मी देवाची प्रार्थना करत होतो की ही माझ्या बाजुच्या सीटवर येवून बसावी. एखाद वेळेस देवाने माझे ऐकल असेल, कारण आमच्याच बाजुच्या रांगेतील सीटवर तिला जागा मिळाली. आमच्या दोघा मध्ये साधारण १ फुटाच अंतर होत. मनातल्या मनात मी खुप खुश होतो. जे पाहिजे ते घडल होत.


तिच्याशी बोलता येण काही शक्य नव्हत, कारण बाजूला वडील बसले होते. काय करू, काही कळत नव्हत. परत कधी ती मला भेटेल माहीत नव्हत. आमच्या दोघात जे काही होत, ते त्या एका क्षणासाठी होत. मी माझा मोबाइल काढला, मोबाइल स्क्रीन वर माझा नंबर टाइप केला आणि तिला दिसेल असा ठेवायचा प्रयत्न केला, पण सगळ व्यर्थ.  नंतर मी माझे सर्व प्रयत्न थाम्बवले. आता फ़क्त मी तिला पाहत होतो. बोरिंग करणारा हा प्रवास आता कधी संपू नये अस वाटत होत. लवकरच लोणेर फाटा आला (लोणेरच्या इंजीनीरिंग कॉलेज ची स्टुडेंट होती ती)  आणि ती बस मधून उतरली. मी फ़क्त तिला जाताना पाहत राहिलो.


प्रवास पुन्हा एकदा सुरु झाला. तो चेहरा पुन्हा पुन्हा दिसत होता. प्रवासाचा क्षीण कधीच निघून गेला होता, आता फ़क्त तिच्या आठवणी  होत्या. तेवढ्यात महाड आल आणि आम्ही उतरलो. आज तिचा चेहरा धूसर दिसत आहे, पण आठवणी मध्ये ती अजुन ही कुठे तरी आहे.


अभिजीत

Tuesday, June 22, 2010

Just Leave

Hey friends, aaj thod 'Relationship' baddal boluya. Till date Rahul came across 8 girls in his life. Aani pratyek veli prem khar hot (atleast Rahul kadun). Yamadhe kahi muli barobar love at first sight, tar eki barobar friendship converts in relationship (love). Rahul hya mulina kadhi visarala nahi, because these girls are part of his life. Pan ekach muli barobar tyach ek serious Relationship banal aani baki relations tar ek tarfi (one sided) cha rahili, kadhi Rahul kadun tar kadhi tichyakadun......vatal hot she is the last one....Rahul was ready to settle with her..............but he broke up .
But question remains the same, (how to survive from such breakup). Answer khup easy aahe, ie Just Leave. Pan he khup kathin aahe, aani khar aahe, jichyavar avadh prem kel tila ek second madhe visaran kathin aahe. Pan aso, visaran tar bhag aahe, so kay karayach???
Ya var tumhala khup lokani khup kahi solutions dili asatil, pan pahile check kara ki kharach ti tumhala patatat ka?? Ugach rag dokyat ghalun ase decisions ghevu naka ki je tumhala nanter tras detil. Avadha lakshat theva, jila barobar rahayacha aahe, tichyakade breakup cha ek hi reason (excuse) nasanar, aani ji sodun janar aahe, tichyakade excuses chi mothi yadi asanar. Aani asha muli barobar rahanyat (life) jaganyat kay maza aahe, so leave her there only. Tila samajavanyat kahi arth nahi, vel ghalavu naka. Mhanun tar me mhantal aahe, Just Leave.
Rahul cha ek mitra nehami mhanayacha,"Girls cry from eye and boys from heart" So no one can see their tears. And dont say, dat i dont believe in love, etc. etc..Try kara, life madhe lavakarach ek navin mulagi asel aani ekhadveles ti tumachi life partner tharel. Aani life madhe prayekache ek swapn asate, te purn karayacha prayatn kara karan tumacha swpan tumhala kadhi sodun janar nahi, tumachya sukhat, dukhat te tumachya barobarach rahanar. Aani me nehami mhantal aahe tya pramane, swapn purn hotana baghan, hyapeksha sunder as jagat kahi nahi. so...be focused...be cool...


ABHIJEET

Monday, June 14, 2010

One Incident

Last weekend aamhi picnic la gelo hoto, tithala ek incident mala tumachyasarvanshi share karavasa vatato. Sunday la me aani mitra Mahabaleswar marketmadhe firat hoto. Firat hoto mhanje kay, mulina tapat hoto. Aani kharach sangato mitrano, Mahabaleshwarmadhe points var jevadhya pori disanar nahit, tevadhya tumhala market madhe disatil, aso...
Asech firata firata, aamhi Mahabaleshwar S.T. stand la chalalo hoto. Tyachya thod aadhi, me eka shop madhun thod sweets ghetal gharchyansathi, aani baher aalo. Thod pudhe zalo, aani pahil 2 sunder muli rastyachya madhomadh ubhya hotya ( perfect in every sense).
Aani tithech ek mhatari (old) aaji bhik(paise) magat hoti, baghun far dukh zal. Aani sahaj manat yeun gel, he as ka aahe???
Aapan picnic la jato, pahije tevadha paisa udavato, jivachi mumbai karato. Aani asha manasankade 2 velache khanyasathi pan paise nahi aahet. Aani aapan je 1, 2 rupees deto, tyamadhe tyanch kay honar aahe??? Aapan tari potbhar khato, pan he lok, ekhada 'Vada-pav' var vel marun netat. He sarv kahi chukich aahe.
Asha lokani jivan bhar kashta karayache, aani mhatarapani (old) pan as jivan jagayacha ka???
hyanchya mulani pan tyana asech sodun deyache ka??? lokansamor hath pasarnyasathi.....
Mhatarpani 2 velacha jevan bhetanyasathi pan, bhik magavi lagat asel tar hyasarakhe dukh kahich nasel. Kharacha aapan khup kahi karu shakato asha lokansathi...
Asach ek incident, me Andheri la job la hoto tithala. Aamhi nehami tight deadline var kam karanare manas, tyamule nehami nighayala ushir hoyacha. Me ratri 11.00 - 11.30 la office madhun nighayacho, aani khali taparivar yeyacho cigarate marayala. Tithe ek 'Mhatari' (old) aaji
rastyachya eka bajula basaleli asayachi, sadharan ti (70 above) asavi. Pan me ek gosht notice keli ki ti konakade paise nahi magayachi, fakt 2 min bolayachi. Mala khup strange vatal, he as ka aahe??? Aani tichyakade pahun dukh hoyacha, khup bikat situation madhe he lok jagatat.
Tya aaji la lokankadun paishachi (rupees) apeksha (hope) navati, tila fakt bolayala aavadayacha,
me jenva aaj vichar karato, tenva mala he kalat. Aapan asha lokanshi kadhi bolat nahi, saral paise deto, aani nighun jato. Pan atlast te he manasach aahet, tyanahi bolayala aavadat. Aapan
1 bhk - 2 bhk flats madhe rahato, aani hyana rahayala sadhi zopadi pan nahi. He pahun vait vatal, aaj pratyekjan (everyone) swatachyach sukhat, dukhat haravala aahe, pratyeka la aapalacha dukh moth aahe as vatat. Pan jenva me he as kahi pahato, tenva as vatat ki aaplyala ji dukh aahet, ti kharach avadhi mothi aahet ka???

ABHIJEET

Wednesday, June 2, 2010

स्वप्न एक भारावलेले

Jivanat manus khup vela khup goshtincha vichar karat asato, tyachya swapanamadhe tyane nehamich ek swpan pahilele asat, pan kharacha te swapn kadhi khar hot ka??? Ha aaj paryant mala nehamich padalela prashna aahe, arthat uttar aaj he bhetal nahi. Pan uttar kahihi aso, manus swapn baghan kadhi sodanar nahi, aani hech jivan jaganyach karan he aahe.

Maaz he ek swapn aahe (very close to heart), mahit nahi purn honar ki nahi, pan aaj hya peksha he jast imp aahe, ki me ek path set karun, tyavar chalan. Khup vela me hya swapnapasun distract zalo aahe. Life madhe bakichya goshtina jast importance dila, aani swatasathi jagan visarun gelo, swapnasathi jagan visarun gelo. Khup thecha khalyaa, khup vela defeat milali.
Ek vel tar ashi hoti ki, hya duniyadarit, swapn swapncha banun rahil. Me kahi jast duniyadari pahili nahi, pan swatasathi jagan kiti important aahe, he kalal. Lokani set kelele marg kadhi aapalyala patalech nahit, ek preplanned life jagan jamalacha nahi, mhanje pahile school, mag college, mag job, mag marriage...... & so on. Aaj me vichar karato, ki kharach settle hon mhanje nakki kay??? "Settle" chi defination aaj paryant konihi banavu shakal nahi, pan lokani settle honyache marg nakki banavale, kase kay banavale kay mahit??? Aso, prashna mala nehamich padatat.

Aaj swatasathi jagan khup imp aahe, tyasathi kahi decisions ghen bhag aahe, set keleya margavarun chalan bhag aahe, baghuya kiti jamatay te. Pan he swapn purn honar he nakki, karan ya swapnamulech maaz ek astitva aahe. Aani he purn hotana baghan, feel karan, hyapeksha jast sunder kahi nahi, mhanun tar me mhantalay "Swapn Ek Bhaaraavalele".

He kavita kahi mazi nahi.......(but its my inspiration)
उडत्या पाखरांना
परतीची तमा नसावी
नजरेत सदा
नवी दिशा असावी
घरट्याचे काय आहे
बांधता येईल केव्हा ही
क्षितीजांच्याही पलीकडे
झेप घेण्याची जिद्द असावी.

ABHIJEET