Monday, January 24, 2011

कॉलेज आठवणी - सारांश (माझ्या विचारातून)

कॉलेज आठवणी ही एक काल्पनिक रंगवलेली आठवण आहे. ह्या कथे मध्ये रंगविलेल्या सर्व व्यक्तिरेखा राशी, सई, ग्रीथा, योगी, विरजा, अभि काल्पनिक होत्या. रंगवलेला प्रत्येक क्षण काल्पनिक होता. रंगवलेल प्रत्येक ठिकाण काल्पनिक होत. रंगवलेल प्रत्येक व्यक्ति चित्र काल्पनिक होत.

जेंव्हा मी ही कथा लिहायला घेतली तेंव्हा मला माहीत ही नव्हत की ह्या कथेचा शेवट काय असणार आहे. व्यक्तिरेखांचा विचार केला तर राशी ही एक अशी मुलगी होती की जी दिसायला खुप सुंदर होती. पण सुंदरतेचा तिला काही गर्व नव्हता. (पुष्कळ मुलींना सेंटर ऑफ़ अट्रेक्शन बनायला आवडत. दहा जणांनी त्यांची स्तुति करावी. वेळोवेळी त्यांना मदत करावी अस त्यांना वाटत. घेयला नेहमी तयार असतात हो, देण्याची वेळ आली तर तुम्हाला ओळखही दाखवत नाहीत) पण राशी ह्या मुलीं पेक्षा खुप वेगळी होती. राशीच हे वेगळ पण अभि ला मनापासून आवडल होत. कथे मध्ये राशी अभि ला शोधत लायब्ररी मध्ये येते आणि कथेला एक वेगळ वळण मिळत.

विरजा मित्रांचा मित्र. छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी ही पार्टी मागणारा. नेहमी हसत खेळत जगणारा. कोणाला घाबरत नाही पण ग्रीथाने रागाने जरी त्याच्याकडे पाहिल तर शांत बसणारा. विरजा ही व्यक्तिरेखा रेखाटताना जास्त विचार नाही करावा लागला. विरजा त्याच्या भूमिकेत बरोबर फिट झाला. योगी ची भूमिका खुप छोटी होती. श्रीमंत घराण्यातला व्यक्ति. थोडासा शांत आणि गंभीर स्वरूपाचा. मोजकच बोलणारा पण विचार करून बोलणारा. त्यामुळे योगी सुद्धा त्याच्या भूमिकेत बरोबर फिट झाला. ग्रीथा ही एक सपोर्टिंग रोल मध्ये होती. पूर्ण कथेत तिच्या वाट्याला २ ते ३ वाक्यच आली असतील. विरजा जसा ग्रीथा शिवाय अधुरा आहे तसच ग्रीथा सुद्धा विरजा शिवाय अधूरी आहे.

शेवटची व्यक्तिरेखा पण खुप महत्वाची.....सई. सई ने थोडा त्रास दिला. भूमिकेत बसायलाच तयार नव्हती. राशी अभि च्या आयुष्यात आली आणि सई ने ह्या कथेची नायिका तीच आहे हे दाखवून दिल. राशी ह्या कथेत आली नसती तर कदाचित अभि आणि सई एकत्र येयला पुष्कळ वर्षे लागली असती.

ह्या कथेची नायिका जरी सई असली तरीही राशी कुठेही कमी पडत नाही. राशीच प्रेम. तिने घेतलेला इनिशिएटीव. अभि ला आपल समजुन त्याच्या सोबत फिरणारी राशी. हृदयाला कुठेतरी भिड़ते. सई बद्दल म्हणाल तर खुप शांत मुलगी हो. भावनांना समजणारी. लाडीकपणे स्वतःचे हट्ट पुरवून घेणारी. रडण्यासाठी जिला कधी कोणा दुसर्याच्या खांद्याची गरज नाही पडली. तिने अभि वर प्रेम केल आणि त्याच्या सोबतच राहिली. अशी सई सुद्धा तिच्या भूमिकेत बरोबर फिट झाली.

ही कथा ४ भागांमध्ये संपली पण आज जेंव्हा मी विचार करतो की माझी प्रेयसी (आयुष्यभराची सोबतीण) कोण असावी??? तेंव्हा वाटत ती सई च असावी.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.


अभिजीत

Friday, January 21, 2011

मैत्री.....समजणारे आणि निभावणारे

आजपर्यंत मी अर्ध्याहून जास्त लिखाण मुलीं बद्दल केल आहे. त्याप्रमाणे पुष्कळ जणांच्या मते मी फ्लर्ट आहे. पण ठीक आहे. ज्या व्यक्ति मला ओळखतात त्यांना माहीत आहे मी कसा आहे. असो. पुष्कळ वेळा आपण काही व्यक्तीं कडून काही गोष्टी एक्स्पेक्ट करतो आणि माझ्या मते हे बरोबर आहे. आपण आपल्या लोकांकडून एक्स्पेक्ट नाही करणार तर कोणांकडून करणार??? पण बघायला गेल तर एक्स्पेक्ट नकरणच चांगल असत.

आपले मित्र मैत्रिणी. पुष्कळ वर्ष आपण एकमेकांना ओळखत असतो. काही व्यक्ति अशा असतात की ज्या मनात कुठलिही कटुता न बाळगता आयुष्यभर मैत्री निभावतात. काही व्यक्ति तुमच्या बद्दल मनात मत्सर ठेवून मैत्री निभावतात. काही व्यक्ति स्वतःच्या हिशोबाने तुमच्याशी मैत्री निभावतात. काही व्यक्ति काही अटी घालून तुमच्याशी मैत्री निभावतात. काही व्यक्ति तुम्हाला मित्र, चांगला मित्र किंवा सर्वात चांगला मित्र या केटेगरी मध्ये ठेवतात. पण तुम्हाला जर मित्र, चांगला मित्र आणि सर्वात चांगला मित्र या मधला फरकच कळत नसेल तर तुम्ही फ़क्त मित्र म्हंटल तरी पुष्कळ आहे हो.

काही जणांना सवय असते की एकमेकांना जास्त ओळख़त नसतील तरीही बेस्ट फ्रेंड म्हणायच. माझ म्हणन एवढच आहे की जर खरच मनापासून वाटत असेल तरच बोला. त्या व्यक्ति कडून काही काम काढून घेण्यासाठी कशाला त्याला बेस्ट फ्रेंड म्हणता???

काही मित्र मैत्रिणी वर्षानुवर्षे तुम्हाला ओळखत असतात. पण मैत्री काय असते हेच त्यांना माहीत नसत.

काही व्यक्ति तुमच्याशी मैत्री करतात. मैत्री करताना काही अटी ठेवतात. ह्या अटी ते काही तुम्हाला सांगत नाहीत पण त्यांच्या  बोलण्यातून आणि वागण्यातून ते तुम्हाला बरोबर दाखवतात.

काही व्यक्ति मैत्री मधून शत्रुता निभावत असतात.

काही व्यक्ति तुमच्या मैत्रिणींना पटवण्यासाठी तुमच्याशी मैत्री करतात.

काही व्यक्ति तुमच्या प्रेयसीला पटवण्यासाठी तुमच्याशी मैत्री करतात. (पण बघायला गेल तर हीच खरी वेळ असते आपल्या प्रेयसीला ओळखण्याची)

पुष्कळ व्यक्ति तुम्हाला गृहीत धरतात. अड़चणीत असताना त्यांना तुमची आठवण येते. आनंदाच्या क्षणी ते तुम्हाला विसरतात.

सांगण्याचा हेतु एवढच की हो, पुष्कळ वेळा काहीतरी हेतु ठेवूनच मैत्री केली जाते. मैत्री समजणारे आणि निभावणारे खुप कमी व्यक्ति आहेत हो ह्या जगात.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत 

Wednesday, January 19, 2011

Quote 8

people wrote big things in der quote like they care for the people.....but do they understand small things?????


ABHIJEET

Quote 7

If you can't argue, then just ignore.

ABHIJEET

Tuesday, January 18, 2011

Quote 7

In friendship some people say "you don't understand me" but do they understand others feeling?????


ABHIJEET

Quote 6

I don't like "Best Friends" tag because many people don't mean dat.


ABHIJEET

Saturday, January 15, 2011

माझ्या ब्लॉगच्या सर्व वाचकांना "मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!"


अभिजीत