Monday, January 24, 2011

कॉलेज आठवणी - सारांश (माझ्या विचारातून)

कॉलेज आठवणी ही एक काल्पनिक रंगवलेली आठवण आहे. ह्या कथे मध्ये रंगविलेल्या सर्व व्यक्तिरेखा राशी, सई, ग्रीथा, योगी, विरजा, अभि काल्पनिक होत्या. रंगवलेला प्रत्येक क्षण काल्पनिक होता. रंगवलेल प्रत्येक ठिकाण काल्पनिक होत. रंगवलेल प्रत्येक व्यक्ति चित्र काल्पनिक होत.

जेंव्हा मी ही कथा लिहायला घेतली तेंव्हा मला माहीत ही नव्हत की ह्या कथेचा शेवट काय असणार आहे. व्यक्तिरेखांचा विचार केला तर राशी ही एक अशी मुलगी होती की जी दिसायला खुप सुंदर होती. पण सुंदरतेचा तिला काही गर्व नव्हता. (पुष्कळ मुलींना सेंटर ऑफ़ अट्रेक्शन बनायला आवडत. दहा जणांनी त्यांची स्तुति करावी. वेळोवेळी त्यांना मदत करावी अस त्यांना वाटत. घेयला नेहमी तयार असतात हो, देण्याची वेळ आली तर तुम्हाला ओळखही दाखवत नाहीत) पण राशी ह्या मुलीं पेक्षा खुप वेगळी होती. राशीच हे वेगळ पण अभि ला मनापासून आवडल होत. कथे मध्ये राशी अभि ला शोधत लायब्ररी मध्ये येते आणि कथेला एक वेगळ वळण मिळत.

विरजा मित्रांचा मित्र. छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी ही पार्टी मागणारा. नेहमी हसत खेळत जगणारा. कोणाला घाबरत नाही पण ग्रीथाने रागाने जरी त्याच्याकडे पाहिल तर शांत बसणारा. विरजा ही व्यक्तिरेखा रेखाटताना जास्त विचार नाही करावा लागला. विरजा त्याच्या भूमिकेत बरोबर फिट झाला. योगी ची भूमिका खुप छोटी होती. श्रीमंत घराण्यातला व्यक्ति. थोडासा शांत आणि गंभीर स्वरूपाचा. मोजकच बोलणारा पण विचार करून बोलणारा. त्यामुळे योगी सुद्धा त्याच्या भूमिकेत बरोबर फिट झाला. ग्रीथा ही एक सपोर्टिंग रोल मध्ये होती. पूर्ण कथेत तिच्या वाट्याला २ ते ३ वाक्यच आली असतील. विरजा जसा ग्रीथा शिवाय अधुरा आहे तसच ग्रीथा सुद्धा विरजा शिवाय अधूरी आहे.

शेवटची व्यक्तिरेखा पण खुप महत्वाची.....सई. सई ने थोडा त्रास दिला. भूमिकेत बसायलाच तयार नव्हती. राशी अभि च्या आयुष्यात आली आणि सई ने ह्या कथेची नायिका तीच आहे हे दाखवून दिल. राशी ह्या कथेत आली नसती तर कदाचित अभि आणि सई एकत्र येयला पुष्कळ वर्षे लागली असती.

ह्या कथेची नायिका जरी सई असली तरीही राशी कुठेही कमी पडत नाही. राशीच प्रेम. तिने घेतलेला इनिशिएटीव. अभि ला आपल समजुन त्याच्या सोबत फिरणारी राशी. हृदयाला कुठेतरी भिड़ते. सई बद्दल म्हणाल तर खुप शांत मुलगी हो. भावनांना समजणारी. लाडीकपणे स्वतःचे हट्ट पुरवून घेणारी. रडण्यासाठी जिला कधी कोणा दुसर्याच्या खांद्याची गरज नाही पडली. तिने अभि वर प्रेम केल आणि त्याच्या सोबतच राहिली. अशी सई सुद्धा तिच्या भूमिकेत बरोबर फिट झाली.

ही कथा ४ भागांमध्ये संपली पण आज जेंव्हा मी विचार करतो की माझी प्रेयसी (आयुष्यभराची सोबतीण) कोण असावी??? तेंव्हा वाटत ती सई च असावी.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.


अभिजीत

4 comments:

  1. ohhh yaar...tu tar na sagali majjach ghalavun takalis hi post lihun......but any which ways u have amazing visualisation power...r u artist?

    ReplyDelete
  2. sorry swapna...jar mi maja ghalavun takali asel tar.....i am a multimedia artist.....writting is my interest and passion.....

    ReplyDelete
  3. ohhh no wonder tht u hv good visualisation skill...after all multimedia artist requires lot of creativity n good visulisation...so tht they can give their thought a reality...

    ReplyDelete
  4. thnxs swapna.....but i dont think dat i am creative.....but it feels good dat you thought it was real but in reality it was a fiction...

    ReplyDelete