Tuesday, August 24, 2010

जन्म, मृत्यु आणि प्रवास

आपल्या जीवनाचे तीन मुख्य अविभाज्य घटक, जन्म, मृत्यु आणि प्रवास. आपल जीवन हे या तीन घटकां मध्येच आहे. मी जेंव्हा विचार करतो, तेंव्हा मला अस वाटत की आपल जीवन हे एका बोगद्या (tunnel) सारख आहे. जिथे एका बाजूने आत येयच आणि दुसरया बाजूने बाहेर पडायच. आणि ह्या दोन टोकांमधल अंतर म्हणजे एक प्रवास.

आता आपण थोड सविस्तर बोलूया. थोडा वेळ समजा, हा बोगदा म्हणजे आपल जीवन. एका बाजूने आत येयच म्हणजे, जन्माला येण. आणि दुसरया बाजूने बाहेर पडायच म्हणजे, मृत्युला सामोर जाण. जन्म आणि मृत्यु या दोहोंमधल अंतर म्हणजे आपल्या जीवनाचा प्रवास. आणि ह्या प्रवास मधे कुठे थाम्बण (stop), हा पर्याय नाही. (there are no signals in tunnel, so you can't stop).

जीवन हे असच आहे, एका नदी सारख. नदी जशी डोंगर खोर्यात उगम पावते, पुढे आपल्या मार्गात येणारा प्रत्येक प्रदेश सुपिक बनवते आणि शेवटी सागरात विलीन होते. तसच आपल जीवन आहे. जन्म, प्रवास आणि मृत्यु. नदीच पाणी हे नेहमी वाहत असत,  तसच जीवनाच्या ह्या प्रवास मधे कुठे थाम्बण (stop) हा पर्याय नसतो.

मला एवढच कळत की, आपण कोणी अंतर्यामी नाही. जन्माला कसे आलो माहीत नाही. मृत्यु कधी होणार माहीत नाही. आपली स्वप्नं पूर्ण होणार की नाही माहीत नाही. स्वप्नं पूर्ण होण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न आपल्या कडून होणार आहेत की नाही हे ही आपल्याला माहीत नाही. (पण मला अस वाटत की, स्वप्न पूर्ण करण हे कधी नसतच, स्वप्न हे आयुष्यभर जगण हेच असत). इथे कुठल्याच गोष्टीची शाश्वती नाही. मग अशी कुठली गोष्ट आहे, जी आपल्याला प्रेरीत करत आहे. आपण आशावादी आहोत आणि पुढे काय होणार आहे हे आपल्याला माहीत नाही. हेच उत्तर आहे यावर. पण एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपण कटपुतली आहोत आणि सर्व काही pre-planned आहे. म्हणून जास्त विचार करू नका, तुमच्या स्वप्नासाठीच तुम्ही इथे आला आहात असा विचार करून शांतपणे आपल काम करत रहा आणि लाइफ full-on जगा.

चला आता मी निरोप घेतो तुमचा, परत लवकर भेटूच.

अभिजीत

Thursday, August 19, 2010

Friends.....there is no substitute for them.....

आपण खुप वेळा खुप विषयावर लिहित असतो पण जे आपल्या जवळचे आहेत, त्यांच्या साठी कधी लिहितो का ? खुप वेळा आपण त्यांना गृहीत धरतो (take it for granted ). आपण विचार करतो, आपलेच आहेत, नाही लिहिल तरी काय फरक पडतो ??? पण कधीतरी त्यांचे आभार व्यक्त करण गरजेचे आहे, कारण ते नसतील तर आपले जीवन अपूर्ण आहे.

माझी फ्रेंड लिस्ट पहिली तर खुप मोठी आहे, (बघायला गेल तर प्रत्येकाची फ्रेंड लिस्ट ही मोठीच असते). १) काही फ्रेंड (हाय, हेल्लो) वाले असतात. २) काही नेहमीच्या contact मधले, (म्हणजे ऑरकुट, फेसबुक, chat ) वरचे असतात. ३) आणि काही (take it for granted ) वाले असतात. 3rd लिस्ट मधले 2nd लिस्ट मधे ही असतात. काही आयुष्यभर तुमच्यासोबत असतील, काही मधेच सोडून जातील.  पण त्या व्यक्तीची कहिनाकाही खास भूमिका तुमच्या आयुष्यात असते.

अशाच काही व्यक्तिंबद्दल आज मी बोलणार आहे :-
सतीश : माझा शाळेत असल्यापासुनाचा मित्र. कोणालाही न घाबरता, लाइफ एन्जॉय करतो. (पण शाळेत असताना खुप शांत होता, आता कोणाला ऐकत नाही भाई)
विजय : कॉलेज मित्र.  नेहमी विचार करून बोलणारा माणूस. पण अजुन ही struggle चालू आहे (विचारांशी).
प्रेमळ : कॉलेज मित्र. प्रत्येक गोष्ट बजेट मधे बसवाणारा माणूस. मित्रांचा मित्र. पण struggle आज ही चालू आहे.
वैभव : कॉलेज मित्र. खुप struggle केल आहे भाई ने. आज एकदम भारी लाइफ जगत आहे.
सुयोग : कॉलेज मित्र. नेहमी एक शिस्तबद्ध लाइफ जगणारा. जे आहे त्यात समाधानी.
मनोज : कॉलेज पासुनाचा मित्र. खुप कमी बोलतो. स्वताच्या तत्वांवर लाइफ जगणारा.
नारायण : कॉलेज मित्र. खुप कमी बोलतो हा भाई. शांतपणे आपली लाइफ जगणार हा.
शकील : ऑफिस मित्र. ह्याने  खुप struggle केली आहे लाइफ मधे, आज सेटल आहे.
गणेश : ऑफिस मित्र. स्वभावाने खुप चांगला, (down to earth person).
दीप्ती : कॉलेज मधली पहिली मैत्रिण. आज सेटल आहेत बाई.
कामिनी : कॉलेज मैत्रिण. कॉलेज व्यतिरिक्त भेटण नव्हत. पण एक चांगली मैत्रिण.
क्रांति : कॉलेज मैत्रिण. आज ही तीच हसण आठवत. माहीत नाही आज ही कुठे आहे.
राशी : कधी बोललो नाही तरी ही आठवणीत आहे कुठे तरी.
स्नेहल : कॉलेज मैत्रिण. कॉलेज व्यतिरिक्त भेटण नव्हत. एक चांगली मैत्रिण.
स्मिता : कॉलेज मैत्रिण. ८ वर्ष जुनी मैत्री.  हिचा struggle आज ही चालू आहे.. :-)
वंदना (senior) : कॉलेज मैत्रिण. तिचा हसरा चेहरा आज ही समोर आहे. खुप चांगली मैत्रिण. आज सेटल आहे.
मानसी : कॉलेज मैत्रिण.  खुप चांगली मैत्रिण. आज सेटल होण्याच्या मार्गावर आहे.
ह्रिषिता (hrishita) : ऑरकुट फ्रेंड. कधी भेटलो नाही. पण ही आज (ohio university) मधे शिकत आहेत.( I miss her ) :-)
अनुराधा : ऑरकुट फ्रेंड. खुप चांगली मैत्रिण. पुण्याला एकदा तिला भेटलो होतो.
स्नेहल : ऑरकुट फ्रेंड. खुप चांगली मैत्रिण.
श्रद्धा : ऑरकुट फ्रेंड. friends हेच तीच लाइफ.
युगा : ऑरकुट फ्रेंड. डोळ्यात काही स्वप्न सजवली आहेत, पूर्ण व्हावी ही इच्छा.
प्रिया : जॉब वर असताना ओळख झाली होती. ५ वर्ष जुनी मैत्री, खरच एक खुप चांगली मैत्रिण.
जुली :  जॉब वर असताना ओळख झाली होती. खुप छान गाते.
प्रांजलि : जॉब वर असताना ओळख झाली होती. एक चांगली मैत्रिण.

ह्यातले सर्वच जण काही माझ्या संपर्कात नाहीत. काही जणांचा उल्लेख करायला मी विसरलो ही असेन. But there is no substitute for friends. भविष्यात आपण कुठल्याना कुठल्या वळणावर परत भेटूच.

अभिजीत

Thursday, August 5, 2010

एक आठवण

खुप दिवस काही लिखाण झाल नाही. विचार केला आज एक तरी पोस्ट टाकुया. आज एका प्रवासताला प्रसंग तुम्हाला सांगणार आहे. साधारण २ वर्षा पुर्वीचा प्रसंग आहे.


मी आणि वडिल महाड (माझे गाव) ला चाललो होतो त्या वेळेचा. ठाणे (खोपट) वरून  सकाळी ६.४५ ची ठाणे-महाबलेश्वर एस. टी. पकडली. रिज़र्वेशन आधीच केले होते. म्हणून काही प्रोब्लेम झाला नाही. पण मला हा प्रवास काही आवडत नाही, गावा ला जायचे म्हणजे मला खुप बोर होते. पण या वेळेस जाण भाग होत. प्रवास बोरिंग असल्यामुळे मी झोप काढायच ठरवल. साधारण रामवाडी ला मला जाग आली. बस स्टॉप ला आम्ही उतरलो, आणि चहा घेतला. थोड़े पाय मोकळे केले आणि बस मध्ये जाउन बसलो. अजुन अर्धा प्रवास बाकि होता. वेळ जात नव्हता, परत ठरवून झोपायचा निर्णय घेतला. कधी संपणार हा प्रवास हाच विचार करत झोपून गेलो. शेवटी मला जाग आली ती इंदापूर ला. गाडी फ़क्त १० मिनिटे थाम्बनार होती, म्हणून गाडीतच बसून राहिलो. प्रवास आता थोडाच राहिला आहे, हे स्वताला समजावत होतो. लोक एक सारखे गाडीत चढत होते, त्या ड्राईवर ला पण काही घाई नव्हती, कोणाची वाट पाहत होता, ते त्यालाच ठावुक. थोड्या वेळाने २ मुली बस मध्ये चढल्या आणि ह्या माणसाने गाडी चालू केली. बहुतेक हा त्या २ मुलींची च वाट पाहत होता...:) मनातल्या मनात शिव्या घातल्या आणि गप्प बसलो.


पण पुढे जे घडल ते खुप भारी होत. जी पहिली मुलगी आत आली, तिच्या बद्दल मी काय सांगू?? खुप सुंदर होती दिसायला आणि तेवढीच साधी ही. दोन क्षण पहातच राहिलो मी. एवढी सुंदर असून ही, त्याचा गर्व नाही तिला. तिने yellow कलर चा पंजाबी ड्रेस घातला होता आणि स्पेक्ट्स. एका हातात पुस्तके आणि दुसरया हातात बेग. ह्या सगळ्या गोष्टी सावरत ती बसण्या साठी जागा शोधत होती.  मी देवाची प्रार्थना करत होतो की ही माझ्या बाजुच्या सीटवर येवून बसावी. एखाद वेळेस देवाने माझे ऐकल असेल, कारण आमच्याच बाजुच्या रांगेतील सीटवर तिला जागा मिळाली. आमच्या दोघा मध्ये साधारण १ फुटाच अंतर होत. मनातल्या मनात मी खुप खुश होतो. जे पाहिजे ते घडल होत.


तिच्याशी बोलता येण काही शक्य नव्हत, कारण बाजूला वडील बसले होते. काय करू, काही कळत नव्हत. परत कधी ती मला भेटेल माहीत नव्हत. आमच्या दोघात जे काही होत, ते त्या एका क्षणासाठी होत. मी माझा मोबाइल काढला, मोबाइल स्क्रीन वर माझा नंबर टाइप केला आणि तिला दिसेल असा ठेवायचा प्रयत्न केला, पण सगळ व्यर्थ.  नंतर मी माझे सर्व प्रयत्न थाम्बवले. आता फ़क्त मी तिला पाहत होतो. बोरिंग करणारा हा प्रवास आता कधी संपू नये अस वाटत होत. लवकरच लोणेर फाटा आला (लोणेरच्या इंजीनीरिंग कॉलेज ची स्टुडेंट होती ती)  आणि ती बस मधून उतरली. मी फ़क्त तिला जाताना पाहत राहिलो.


प्रवास पुन्हा एकदा सुरु झाला. तो चेहरा पुन्हा पुन्हा दिसत होता. प्रवासाचा क्षीण कधीच निघून गेला होता, आता फ़क्त तिच्या आठवणी  होत्या. तेवढ्यात महाड आल आणि आम्ही उतरलो. आज तिचा चेहरा धूसर दिसत आहे, पण आठवणी मध्ये ती अजुन ही कुठे तरी आहे.


अभिजीत